निसर्गाने गलाड्यांच्या पिवळ्या फुलांचा शालू पांघरल्याचा भास
चिंबळी -गेल्या दोन-तीन दिवसांसून गुलाबी थंडी पडू लागल्याने खेड तालुक्याच्या दक्षिण भागात शेतकऱ्यांनी घेतलेली फुल शेती बहरली असल्याने जिकडे-तिकडे गलाड्यांची पिवळी धमक फुले नजरेस पडत असल्याने निसर्गाने जणू पिवळ्या फुलांचा शालू पांघरला असल्याचा भास निर्माण होत आहे.
इंद्रायणी नदीवर खेड व हवेली तालुक्यात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधले असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे मोई, कुरुळी, चिंबळी, केळगाव आदि परिसरातील शेतकरी वर्ग 12 महिने विविध प्रकारच्या पिकांचे उत्पन्न घेतात; परंतु यावर्षी परतीच्या मुसळधार पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका आहे.
दरम्यान, मरकळ, सोळू, धानोरे, केळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, केळगाव परिसरात शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही झेंडू, ऍष्टर गलांड्या, बिजली व इतर फुलांची लागवड केली आहे.
मात्र, ढगाळ वातावरणामुळे फुलांचे उत्पन्न घटणार असल्याने केलेला खर्च व्याया जातो की काय या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले होते. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसापांसून वातावरणात पुन्हा बद्दल झाला असल्याने थंड हवामान निर्माण झाले असल्याने गलांड्यांची फुले बहरील असल्याने जिकडे नजर जाईल तिकडे पिवळसर फुलेच दृष्टीस पडत असल्याने बऱ्यापैकी उत्पन्न हातात येईल, असा अंदाज शेतकरी वर्ग वर्तवित आहे.