कोल्हापूर : कोल्हापूर येथील पंचगंगा नदीला पूर आला असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पाणी पातळी 43 फुटावर पोहचली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती सध्या गंभीर स्वरूप घेत असून गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कडे जाणारा रस्ता अद्याप बंदच आहे. 102 मार्गावर पुराचे पाणी आल्याने 33 मार्ग पूर्णतः बंद आहेत. 100 पेक्षा अधिक गावांचा अंशतः संपर्क तुटलेला असून कोल्हापूर शहर ,शिरोळ ,आंबेवाडी, चिखली गावांना पुराचा धोका वाढला आहे.
राधानगरी धरण 98 % भरले असून राधनागरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येतील. त्याचप्रमाणे चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी प्रकल्प ओहरफ्लो झालेला आहे. तसेच जिल्ह्यातील 8 प्रकल्पातून विसर्ग नदीपात्रात सुरूचआहे.