Sanjay Raut – पाचहीं राज्यांतील आगामी विधानसभा (Assembly Election)निवडणुकांमध्ये कॉंग्रेसलाच विजय मिळेल असा विश्वास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा आज जाहींर झाल्या त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.
राऊत म्हणाले की ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यापैकी तीनमध्ये कॉंग्रेसने (Congress) पाच वर्षांपूर्वी विजय मिळवला होता. यावेळी सर्व राज्यांमध्ये कॉंग्रेस व इंडिया आघाडी जिंकेल.
तेलंगणात भारतीय जनता पक्ष 10 जागाही जिंकू शकणार नाही, असे राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.अन्य राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका होत आहेत.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर न केल्याबद्दल त्यांनी सरकारला सवाल केला. मुंबईसह महाराष्ट्रात तुम्ही 14 महानगर पालिका निवडणुका रखडवल्या आहेत. तुम्ही प्रशासकाचा वापर करून भ्रष्टाचार करत आहात.
तुम्ही इथे कधी निवडणुका घेणार असा सवाल त्यांनी केला. इस्रायल-हमास संघर्षावर बोलताना राऊत म्हणाले की, भारताने इतिहास विसरू नये. ही आंतरराष्ट्रीय बाब आहे.
आमच्या देशाने पॅलेस्टाईनला मान्यता दिली होती. यासर अराफात आणि इंदिरा गांधी यांचे चांगले संबंध होते.भारत पॅलेस्टाईन यांच्यात जवळीकीचे नाते आहे तो इतिहास आपण विसरता कामा नये असे ते म्हणाले.