नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23675 कोटी रूपयांच्या अतिरीक्त खर्चाच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव संसदेत सादर केला. त्याला मान्यता मिळणे बाकी आहे. हा चालू अर्थिक वर्षातील अतिरीक्त खर्च आहे.
केंद्र सरकारकडून एकूण 1 लाख 87 हजार कोटी रूपयांच्या अतिरीक्त खर्चाला संसदेची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील या मागण्या आहेत. संसदेत सध्या गोंधळामुळे कामकाज ठप्प आहे. त्यामुळे या प्रस्तावावर चर्चेविनाच मंजुरी घेतली जाण्याची शक्यता आहे.
या खेरीज देशातील महागाईच्या संबंधातही विरोधकांकडून काहीं तहकुबी सुचना देण्यात आल्या आहेत. त्यावेळी अर्थमंत्र्यांकडून संसदेत निवेदन केले जाण्याची शक्यता आहे. इंधनदरवाढीच्या विषयावरही विरोधकांनी संसदेत चर्चा मागितली आहे.