बावडा -गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी दाटू लागली होती. बुधवारी (दि. 25) बावडा परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जगावर करोना सारख्या गंभीर विषाणूंच्या साथीचे मोठे संकट कोसळले आहे. हे संकट आपल्याकडे जास्त फैलाव होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
असे असताना अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे हाता तोंडाला आलेली पिके भुईसपाट होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
शेतामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, मका आदी पिकांबरोबरच द्राक्षाचा चालू असलेला हंगाम, डाळिंब आदी फळबागांना अवकाळीचा मोठा फटाका बसण्याची शक्यता आहे.
करोना विषाणू आणि अवकाळी पाऊस अशा अडचणींमुळे शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.