नवी दिल्ली – करोनानंतर देशातील आणि परदेशातील परिस्थिती आता वेगाने पूर्ववत होऊ लागली आहे. त्यामुळे निर्यातीला वेग येऊ लागला आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये भारताच्या निर्यातीत 22.63 टक्क्यांची वाढ होऊन या महिन्यात भारताने तब्बल ते 33.79 अब्ज डॉलरची निर्यात केली आहे. इंजिनिअरिंग आणि पेट्रोलियम क्षेत्रातून जास्त निर्यात झाली असल्याचे सांगण्यात आले.
त्याच्याबरोबरच आयातही 84 टक्क्यांनी वाढून 56 अब्ज डॉलरची झाली आहे. त्यामुळे व्यापारातील तूट वाढून 22 अब्ज डॉलर इतकी झाली असल्याचे सांगण्यात आले.