पुणे – आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर आषाढी वारी करता येणे शक्य झाले नाही, तरीसुद्धा वारीचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. संतांच्या अभंगांचे वाचन करून एकेक ओवी अनुभवावी, वारकऱ्यांची सेवा करावी, असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.
टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी कृष्णकुमार गोयल यांनी हे वक्तव्य केले. विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व संस्थाचालक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
वारकऱ्यांना कृष्णकुमार गोयल यांच्यामार्फत. मेडिकल किट व प्रथमोपचार पेटी चे वाटप करण्यात आले. यावेळी रासेयो विभागामार्फत खाद्यपदार्थांचे वाटप वारकऱ्यांना करण्यात आले. प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांनी वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या वारीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे चिटणीस आनंद छाजेड, मुरकुटे, रमेश अवस्थे, राजेंद्र भूतडा हे उपस्थित होते त्याचबरोबर महादेव रोकडे, शेलार, दळवी, पाटील, संजय जगताप, जाधव, बाबा गायकवाड, मनीषा जाधव, जोशी विजय जोशी, ज्ञानेश्वर गायकवाड, गणेश जाधव हे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.