इंद्रायणीनगर, (वार्ताहर) – समाजात शिक्षणाच्या आकांक्षा वाढत आहेत, पण शिक्षणाची संधी मर्यादित होत आहे. जनतेला शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे परखड मत ज्येष्ठ गांधीवादी नेत्या डॉ. रजिया पटेल यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेच्या आरटीई 25 टक्के आरक्षण पालक संघ मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. भोसरीतील दिघी रस्त्यावरील विरंगुळा केंद्रात शिक्षण हक्क सभेच्या पालक मेळाव्यात बोलताना डॉ. रजिया पटेल यांनी सरकारने शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वाढवण्याची मागणी केली.{ Right to Education }
या मेळाव्यात तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या. एक म्हणजे या कायद्यानुसार 25 टक्के आरक्षण व मोफत शिक्षण पहिली ते आठवीपर्यंत मिळते. ही सवलत पुढे इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना मिळावी. सर्व शिक्षण सर्व मुलांना मोफत, समान व गुणवत्तापूर्ण मिळावे. शिक्षणाचे खासगीकरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली. डॉ. शरद जावडेकर, सुरेखा खरे यांनी मनोगत व्यक्त केले. { Right to Education }