मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिविर लसीच्या तुटवड्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये विसंवादी चित्र निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्याला जवळपास दुपट्ट रेमडेसिविर पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
केंद्राने राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार इंजेक्शनचा पुरवठा देण्याचे आदेश शनिवारी काढल. हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार इंजेक्शनचा होत होता. कालच झायडस कॅडिलाच्या औषधाच्या वापराला भारतीय औषध नियामकांनी शनिवारी आपत्कालीन परवानगी देण्यात आली होती. झायडसच्या लस वापराने सात दिवसांत करोनाच्या विषाणूंचा केस लोड कमी होत असल्याच दावा या कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.
आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. 21 एप्रिल ते 31 एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे 16 लाख रेमडेसिवीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे
राज्यात आज 67,167 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज 67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के झाले आहे. राज्यात आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.