पवार, शिंदे -फडणवीस सरकार बनल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारावरून प्रहारचे नेते बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा अनेकदा रंगली. अशात आता पुन्हा एकदा बच्चू कडू शिंदे सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. बच्चू कडू दिव्यांगाच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहे.
पुण्यात दिव्यांगाच्या भव्य नोकरी कार्यक्रमात बच्चू कडू म्हणाले,’दिव्यांगाना निधी न दिल्यास आम्ही तुमच्यासोबत आमदार असलो तरी ‘आपको हम भूल जायेंगे’ असं म्हणत सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
ते पुढे म्हणाले,’दिव्यांगांना रोजगार मिळाला पाहिजे. दिव्यांगांचं भलं कसं होणार. नोकरी नाही तर दिव्यांगांना उद्योगासाठी काहीतरी केलं पाहिजे. यासाठी चौफेक काम करणे गरजेचं आहे. मागील ७५ वर्षांत दिव्यांगांसाठी काही खास काम झालेले नाही. अनेक गोष्टी करणे बाकी आहे, असं ते म्हणाले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलतांना कडू यांनी खासदारांच्या निलंबनाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले,’एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचा अतिरेक होऊ नये, संसदेच बळ हे राजकीय बळ म्हणून भाजप वापरत आहे. संसदेचं बळ सामान्य माणसासाठी वापरले गेले पाहिजे. सगळ्यांना सरसकट निलंबित करणे म्हणजे उद्या तुमच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, तसे करू नये.’