मुंबई – शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त अखेर ठरला असल्याची आहे. या प्रकरणी बुधवार 10 जानेवारी रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचे समजते. यावरूनच आता राजकीय प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झाली आहे.अशात एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला फरक पडणार नाही अस वक्तव्य भाजप नेत्याने केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला हा निर्णय संपूर्ण देशासाठी दिशादर्शक असेल आणि महत्वाचा असणार आहे.असं परखड मत भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरण शेवटी ही न्यायालयीन बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी आले आहे. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत. आता ते जो निर्णय देणार असतील तो सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे.असं स्पष्ट मत देखील या भाजप नेत्याने व्यक्त केलं.
आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय काहीही आला तर सरकावर परिणाम होणार नाही. सरकार स्थिर राहणार आहे. आमच्याकडे 200 च्या वर आमदारांची संख्या आहे. शिवसेना आमदार अपात्र ठरले तरी आमच्यासोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. परंतु शिंदे यांच्याकडे बहुमत असल्यामुळे त्यांच्या शिवसेनाला काही होणार नाही असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणालेत.