पुणे (प्रतिनिधी) – करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. यामुळे अतिमहत्वाचे खटले वगळता न्यायालयीन कामकाज बंद आहे. यामुळे विधीज्ञ मंच पुणेच्या वतीने राज्य भरातील वकिलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, एक हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
मानवाधिकार आणि भारतीय न्यायालये, लोकप्रतिनिधींची कायदेशरी जाबाबदारी, वकिली व्यवसाय आणि वकिलांच्या बार कौन्सिल कडून असणार्या अपेक्षा हे विषय निबंध स्पर्धेसाठी देण्यात आले आहे. स्पर्धेसाठी कुठलेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेत भाग घेणार्या इच्छुक वकिलांनी मराठी, इंग्लिश भाषेत लिखित अथपा टाईप केलेला निबंध vidhidnyamanch@gmail.com मेलवर पाठवावे असे आवाहन मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
निबंध पाठविण्याची अंतिम रारीख 10 मे आहे. तसेच स्पर्धेचा निकाल 25 मे रोजी घोषीत करण्यात येणार आहे. स्पर्धेतसहभागी होण्यासाठी या https://forms.gle/euvbKtM5qRdXr9ej9 लिंकमध्ये दिलेला फॉर्म भरून नावनोंदणी करणे आवश्यक असणार आहे.