साउदम्पटन :- वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी अत्यंत दर्जाहीन फलंदाजी केल्यामुळेच त्यांना पराभव पत्करावा लागला. या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांत त्यांना जबाबदारीने खेळ करताना फलंदाजीतही सुधारणा करावी लागणार आहे, असे मत इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी व्यक्त केले आहे.
पहिल्या कसोटीत इंग्लंडला दोन्ही डावांत फलंदाजी करताना अपयश आले. त्यांना मोठी धावसंख्याही उभारता आली नाही. घरच्या मैदानावर खेळण्याचा कोणताही लाभ घेण्यात त्यांना यश आले नाही, असेही त्यांनी सांगितले.