मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावेळी त्यांनी भाजपविरुद्ध चकार शब्द त्यांनी काढला नाही. उलट मोदी सरकारचं कौतुक केलं. राज यांनी भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नकल केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.
India is a country of different languages, religions & cultures, it is our responsibility to keep the country united. It is really sad that people are giving such statements about religion, it shows their mentality: Nitin Raut, Maha Minister on Raj Thackeray’s statement (04.04) pic.twitter.com/gB8INsfSWl
— ANI (@ANI) April 4, 2022
यातच राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारत हा विविध भाषा, धर्म आणि संस्कृतींचा देश आहे, देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. लोक धर्माबाबत अशी विधाने करतात हे खरोखरच खेदजनक आहे, यातून त्यांची मानसिकता दिसून येते’ असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.