ठाणे – महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी देणारे पत्र पाठवले आहे. हे पत्र शुक्रवारी ठाणे आणि गडचिरोलीचे पालकमंत्री असलेल्या शिंदे यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते, त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धमकीच्या पत्रासंदर्भात ठाणे पोलिसांना मिळालेली तक्रार पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे. आपल्याला यापुर्वीही अशा धमक्या आल्या आहेत असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तथापि गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी त्या जिल्ह्यांत पायाभूत सुविधांचा विकास करणे हाच एकमेव मार्ग आहे असेही शिंदे यांनी म्हटले आहे.