मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी एका गोष्टीवर आपली कबुली दिली आहे. त्यांनी ‘भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी घेण्याबाबत शरद पवार आपल्याला सांगत होते. मात्र, आपण त्यावेळी त्यांचे एकलं नाही, ही आपली मोठी चूक झाल्याचे वक्तव्य खडसे यांनी केले. एवढंच नाही तर त्यामुळं आपली पाच वर्ष वाया गेल्याची कबुली एकनाथ खडसेंनी दिली.
जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी घ्या असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितले होते. मात्र आपण शरद पवार यांचं त्यावेळी एकलं नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. ही आपली चूक झाली असल्याची कबुली एकनाथ खडसेंनी दिली.
भाजपमध्ये असताना 2019 मध्ये पक्षाने मला तिकीट दिले नाही. त्यामुळं माझी पाच वर्ष वाया गेल्याचे खडसे म्हणाले.
त्यावेळी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याबाबत शरद पवार मला सांगत होते. मात्र इतकी वर्ष भाजपचा विस्तार करण्यात घालवली होती. त्यामुळं पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता. मी संभ्रम अवस्थेत होतो असेही खडसे म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी तिकीट दिले नव्हते. त्याची मुलगी रोहिणीताई खडसे यांनी भाजपने तिकीट दिले होते. या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपमधीलच काही गद्दारांनी त्यांना पाडण्यासाठी काम केल्याचा आरोपही एकनाथ खडसेंनी केला होता. दरम्यान, त्यानंतर एकनाथ खडसेंनी शरद पवार यांच्या उपस्थितीत 23 ऑक्टोबर 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जर मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी घेतलं नसतं तर माझं राजकीय करिअर संपुष्टात आले असते असे खडसे म्हणाले होते.