जुन्नर-परतीच्या पावसाने जुन्नर तालुक्यातील खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. याबाबतचे निवेदन जुन्नरचे नायब तहसीलदार सचिन मुंढे यांना देण्यात आले.
तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागांतुन अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जुन्नर परिसरात येत असतात. या विद्यार्थ्यांसाठी शासनाने बसचे मोफत पास द्यावेत, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी अभाविपचे उत्तर पुणे जिल्हाप्रमुख मनोहर चव्हाण, आकाश गाडे, रविंद्र डोंगरे, प्रथमेश आमले, कैलास साळुंखे, विद्या कबाडी, संदीप पारधी, स्वाती घोगरे, अनिल साळवे, अभिजित खैरे व कार्यकर्ते उपस्थित होते.