स्वातंत्र्य उजाडले पण “स्वराज्य’ कोठे आहे? एस. एम. जोशी यांचा सवाल
पुणे, ता. 11 – “” हा देश “आपला’ आहे हे कितीतरी लोकांना जाणवत नाही, म्हणून स्वातंत्र्य मिळाले असले तरी “स्वराज्य’ आले असे म्हणता येणार नाही,” असे उद्गार एस. एम. जोशी यांनी काढले. कै. साने गुरुजी यांच्या तेवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त येथील “साधना’ कार्यालयातील आंतरभारती सभागृहात भरलेल्या सभेत अध्यक्षस्थानावरून भाषण करताना एस. एम. यांनी वरील विचार मांडले.
ते म्हणाले, “”स्वातंत्र्य मिळाले तेव्हा असे वाटले होते की, आता ज्या प्रमाणात एकात्मता वाढेल त्या प्रमाणात देशाचे सामर्थ्य वाढेल. परंतु एकात्मतेच्या आड जे प्रश्न होते ते सुटले तर नाहीच, पण अधिक गुंतागुंतीचे मात्र झाले आहेत.”
बलुचिस्तान पाकिस्तानमधून फुटून निघण्याची शक्यता
तेहरान – “बलुचिस्तान प्रांतातून सध्या चालू असलेला गोंधळ थांबविण्यास जर पाक सरकार अपयशी ठरले तर या प्रांतात पाकमधून फुटून निघण्याची चळवळ उभी राहील.’ पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री अझीझ अहमद यांनी आज हा विचार सेंटो संघटनेच्या अधिवेशनात मांडला. ते म्हणाले, “भारताबरोबर 1971 मध्ये झालेल्या युद्धात इराण सोडून सेंटो. संघटनेच्या कोणत्याही सभासद राष्ट्राने पाकला मदत केली नाही.’
जपानची श्रीमंती
नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षांत केलेल्या पाहणीवरून जपानी संशोधन संस्थेने असा
निष्कर्ष काढला आहे की, “जपान हा अमेरिकेच्या निम्म्याने श्रीमंत असून पश्चिम जर्मनीच्या दुप्पट सामर्थ्यवान आहे.’