शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देणे हितावह नाही
पुणे, दि. 6 – भारतातील बहुसंख्य लोक जे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत व बेकार आहेत, त्यांच्या भवितव्याचा विचार करता शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देणे उपकारक नाही. यामुळे जरी शेती उत्पादनात वाढ झाली तरी बेकारीत कितपत घट होईल याबाबत मी साशंक आहे, असे विचार विख्यात अर्थतज्ज्ञ प्रा. वि. म. दांडेकर यांनी व्यक्त केले.
उर्दू भाषा सोपी करण्याची गरज
लखनौ – उर्दू भाषा अधिक सोपी झाली पाहिजे व तिला राष्ट्रीय जीवनात योग्य स्थान मिळाले पाहिजे, असे राष्ट्रपती फरूद्दीन अली अहमद यांनी सांगितले. उर्दू महत्त्वाची भाषा आहे व उर्दू विशिष्ट धर्माशी निगडीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रशियाकडून आठवा भूमिगत अणुस्फोट
वॉशिंग्टन – रशियाने भूमिगत चाचणी अणुस्फोट केला आहे, असे अमेरिकेच्या निदर्शनास आले आहे. भूगर्भलहरींवरून दिसते की, सैबेरियाच्या मध्य भागात बैकल सरोवराच्या उत्तरेस सुमारे 600 किमी अंतरावर हा स्फोट करण्यात आला असावा. रशियाचा यावर्षीचा हा 8वा भूमिगत अणुस्फोट आहे.
एक पंचमांश लोकांत दृष्टिदोष
चंदीगड – देशातील एक पंचमांश लोकांत दृष्टिदोष आढळतो व त्यांच्याकडे लक्ष देण्याची जरुरी आहे, असे डॉ. आय. एस. जैन यांनी सांगितले. 3 टक्के शालेय व 12 टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चष्म्याची गरज असते. देशातील 105 कोटी लोक अंध असून त्यापैकी दोनतृतीयांश लोकांवर यशस्वी उपचार होऊ शकतील.