शिर्डी -कोव्हीड रुग्णांच्या जिल्ह्यातील वाढत्या संख्येला आणि मृत्यूला केवळ जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत आहे. तसेच नगर जिल्हा संकटात असताना पालकमंत्रीसुध्दा केवळ पाहुण्यासारखे येतात आणि जिल्ह्यातील तिन्ही मंत्री करतात काय?, असा प्रश्न पडतो, अशी टीका सवाल माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
नगरमध्ये काल एकाच दिवशी मोठ्या संख्येने झालेल्या अंत्यविधीच्या दुर्दैवी घटनेवर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले, “”नगर जिल्ह्यावर अशी दुर्देवी वेळ यावी, हेच खूप वेदनादायी आहे. मागील काही दिवसांत प्रशासन फक्त “ब्रेक दी चेन’मध्ये गुंतले आहे. त्यातून कोव्हीड रुग्णांची संख्या आटोक्यात आली का? उपचारांसाठी रुग्ण वणवण भटकत आहेत. ऍडमीटसाठी बेड्सची उपलब्धता नाही, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. या संदर्भात प्रशासनाला विचारणा केली तर आम्ही सूचना दिल्या आहेत, येवढेच मोघम उत्तर मिळते. मग नेमक्या सूचना केल्या कुणाला? असा प्रश्न आहे.”
नगर जिल्ह्यातील तीन मंत्री सरकारमध्ये आहेत. परंतू एकानेही कोव्हीड रुग्णालय उभे केलेले नाही. त्यामुळेच सामान्य रुग्णालयांच्या भरवशावरच राहावे लागत आहे. पालकमंत्रीही केवळ पाहुण्यासारखे येतात आणि जातात, असा खोचक टोला लगावून