मुंबई: महाविकास आघाडीने आज अर्थसंकलप सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडला. यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या पाच वर्षात अंधांधुंदपणे केलेल्या कारभारामुळेच मागील दहा वर्षात विकासदर निच्चांकी पातळीवर आणून अर्थव्यवस्था कमजोर करण्याची कामगिरी भाजप सरकारने केली, असल्याचे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, “आपले सरकार कामगिरी दमदार” ही जाहिरात दाखवण्यातच शासनाची तिजोरी रिकामी झाली असावी अशी शंका येते.
‘मेकअप’ अर्थसंकल्पाच्या भुलभुलैय्यातून बाहेर पडून ‘मेकओव्हर’ अर्थसंकल्प मांडून खराखुरा विकास करणं हे महाविकास आघाडी सरकारचं ध्येय आहे. तिजोरी रिकामी असतानाच्या संकटाच्या काळात अर्थमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारा आणि अर्थव्यव्यवस्थेला स्थिरता आणणारा करणारा अर्थसंकल्प मांडण्यात येईल, अशी मला खात्री आहे.