पंढरपूर : भाजप नेते डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यातून काढण्यासाठी कंबर कसली आहे. सुब्रमण्यम स्वामी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सरकारमुक्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. यासाठी लवकरच ते पंढरपूरला येणार असल्याची माहिती आहे.
ते म्हणाले,“पंढरपुरात हिंदू भक्तांना त्रास दिला जातोय. सरकारने हिंदू मंदिरं हडपली आहेत. ही मंदिरं सरकारच्या ताब्यातून सोडवण्यासाठी मी स्वतः पंढरपुरात जाऊन लोकांना भेटणार आहे. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेन. भगवान कृष्णांना सर्वजण मानतात. हिंदूंच्या पुनर्उत्थानासाठी हे करणं आवश्यक आहे.”
दरम्यान, वारकरी संप्रदायातील महाराजांची डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकतीच भेट घेतली. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी ते लवकरच पंढरपूरलाही भेट देणार आहेत. डॉ सुब्रमण्यम स्वामी यांची कायदेतज्ज्ञांची टीम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिराबरोबरच सर्व हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ते पावलं उचलत आहेत.