मुंबई – दक्षिणेतील अभिनेता ‘सुर्या’चा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला आहे. या चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपटामध्ये आदिवासी समुहावर आधारित आहे.
चित्रपट प्रदर्शित होताच एकाच दिवसात सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना सोशलवर दिसून येत आहे.
I dnt know from when I started saying “JaiBhim” in my public address … it’s a revolutionary slogan not linked to any caste which gives u energy to fight all kind of injustice
Just saw #JaiBhim and just thot if #BabaSahebAmbedkar would not have been there .. depressing #JaiBhim— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 8, 2021
अशातच, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ‘जय भीम’ चित्रपट पाहिल्यानंतर मनापासून अस्वस्थ झाल्याचे म्हटले आहे. हा चित्रपट पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर…, असा प्रश्न पडल्याचे आव्हाड म्हणाले.
काय आहे जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
‘मी माझ्या भाषणात यापूर्वी कधी जय भीम म्हणायला लागलो मला आठवत नाही. जय भीम हि घोषणा एका जातीशी संबंधीत नसून ते एक उर्जास्त्रोत आहे. हे उर्जास्त्रोत तुम्हा आम्हाला अन्यायाविरुद्ध, स्वाभीमानासाठी, स्वत्वासाठी उभे राहायला मदत करते, ताकद देते. आजही आपण पूर्णपणे जातीभेदाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडलेलो नाही. ते पुढे ट्विट मध्ये लिहितात ‘जय भीम’ चित्रपट पाहिल्यानंतर मन अस्वस्थ झाले आहे.