वाघोली : खाणकामगार हे परमात्म्याचे सुख असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांनी केले.वाघोलीतील दगडखाण कामगारासोबत संतुलन संस्थेने आयोजित केलेल्या दिवाळी महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. मोरे बोलत होते. यावेळी दगडखाण कामगारा सोबतची दिवाळी म्हणजे दिवाळी सणाचा कळसच होय असे भावपूर्ण उद्गार पुणे धर्मप्रांताचे महागुरू डॉ. थोमस डाबरे यांनी व्यक्त केले.
दिपावली महोत्सवाची सुरुवात स्वच्छंद पुणे प्रा. रवींद्र शाळू यांच्या संगीत संध्या या गीत गायन कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पुणे धर्मप्रांताचे महागुरू डॉ. थोमस डाबरे, उदयोजक परागमामा मते, जागृती ग्रुप संस्थापक राज देशमुख, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील,बी.एम.रेगे, वसुंधरा उबाळे,शिवदास उबाळे, शंकरराव पठारे, दिपकजी साळुंके,कन्हेयालाल अग्रवाल, उद्योजक विजय सर,अनिल सातव पाटील, शनीभाऊ शिनगारे, सुनील जाधवराव, वंदनाताई भुजबळ, सुनिता सराटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन संतुलन संस्थेचे संस्थापक पल्लवी रेगे, पार्वती चव्हाण फाउंडेशनचे संस्थापक गणेश चव्हाण, राष्ट्रप्रेमी युवा मंचचे संस्थापक भोलाशेठ वांजळे,आदिनाथ चांदणे, अनिल राजगुरू, प्रिया डाडर, स्नेहप्रभा वैराळ, सीमा साळवे, संध्या पाटोळे, निखील गायकवाड यांनी केले. उपस्थितांचे आभार शांताराम बापू कटके यांनी मानले.