गेल्या शतकाकडे वळून पाहिले तर 1720 मध्ये पलेग ची साथ, 1820 मध्ये काॅलरा ची साथ, 1920 मध्ये फलयू ची साथ आणि 2020 मध्ये करोना ची साथ…करोना( covid19) व्हायरसमुळे चीन, इटली, अमेरिका, फ्रान्स, इराण, जर्मनी आणि भारत या देशामध्ये भयभयीत परिस्थिती निर्माण झाली आहे.
सर्वात पहिले करोना चा रूग्ण चीन मध्ये आढळला;चीन ने व्हायरस निर्माण केला आहे असा गैरसमज आहे. व्हायरस तयार करण्यात इतके तंत्रज्ञान विकसित झालेले नाही म्हणून चीन ने व्हायरस तयार केला असेल हे खरे नाही. सध्याच्या परिस्थितीत हा व्हायरस जनुकीय बदल होऊन वटवाघळांतून खवलया मांजरात गेला आणि खवलया मांजरातील व्हायरस मध्ये जनुकीय बदल होऊन तो माणसात आला याची शक्यता आहे. या वहायरसने सर्वत्र थैमान घातले आहे. भारत केंद्र सरकारने या व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून शाळा, काॅलेज, क्रीडा, बाजार, माॅलस्,धार्मिक, ऐतिहासिक स्थळे, मनोरंजनाची ठिकाणं (31मार्च) बंद करण्याचा आदेश दिला आहे.
बंदी घालताना सर्व सामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा निर्माण होणार नाही, आर्थिक शोषण होणार नाही, फसवणूक केली जाणार नाही, शैक्षणिक वर्ष आणि इतर क्षेत्रावर परीणाम होणार नाही याची काळजी व्यवस्थापन करताना घ्या वीत. सध्याच्या परिस्थितीत कोणते बदल झाले आहेत ; हे सोशल मीडीयाद्वारे काही क्षणातच कळतात परंतु या माध्यमातूनच खोट्या अफवाही पसरत आहेत या अफवावर विश्व न ठेवता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेवून या विषाणूंचा (व्हायरस) मुकाबला केला पाहिजे.
पुढील काही दिवस आपल्या सर्वासाठी महत्वाचे असून तरूण पिढी साठी/ विद्यार्थ्यासाठी आवाहन आहे. “ना दिवाळी, ना दसरा “तरी सुद्धा सुट्टी फक्त मौजमजा असा गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये आहे. खरेतर या दिवसांना वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. सर्व सामान्य लोक या विषाणूवर तज्ज्ञ डॉक्टर, शास्त्रज्ञ रोग प्रतिबंधक लस निर्माण करतील यांवर अवलंबून आहेत;परंतु वैयक्तिक पातळीवर काळजी घेऊन विचारसरणीत बदल करून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर व्हायरसचे बाह्य प्रोटीन नाहीसे झाले तर व्हायरसही नाहीसा होतो. हे तापमानामुळे, साबणामुळे, हवेमुळे, उन्हामुळे कशानेही होऊ शकते आणि कारण मिळाले नाही तर व्हायरसही जगातून नष्ट होऊ शकतो. असे कुटुंबातील, परीसरातील लोकांना सांगून मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा तसेच या दिवसांमध्ये मागील शतकांचा अभ्यास करून करोना व्हायरस प्रतिबंध कसा करण्यात येईल याचा आढावा घ्यावा.
– प्रियांका निवडुंगे,
कॉलेज रिपोर्टर,
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय,
तळेगाव दाभाडे