सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे जाळे पसरत असलेले दिसते. डिजिटल साक्षरता तितकी वाढली नसल्यामुळे अनेकजण अशा प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडताना दिसतात. आपली थोडीशी बेपर्वाई देखील आपले खूप मोठे नुकसान करू शकते. त्यातही अनेकदा आपल्या नावाचा, पॅनकार्ड, आधारकार्डचा गैरवापर करून डुप्लिकेट सिम कार्ड काढले जाते आणि सायबर गुन्ह्यासाठी ते वापरले जाते. अशा फसवणुकीपासून कसे वाचता येईल, यासंदर्भात काही सोपे उपाय नक्कीच करता येतील. पाहुयात, कोणते आहेत ते उपाय.
1) आधार, पॅन, लाइट बिल अशा KYC साठी लागणार्या पेपरच्या झेरॉक्स चांगल्या प्रतिष्ठित दुकानातूनच काढाव्यात व त्याची पावती जरूर घ्यावी. KYC पेपरच्या झेरॉक्सवर लाल पेनाने कशासाठी देत आहे – Use for….. Purpose Only. असा स्पष्ट उल्लेख आठवणीने करावा.
2) आपल्या नावावर किती सिमकार्ड रजिस्टर आहेत ते शोधून नको असणारी, वापरात नसणारी, स्वतःची नसणारी सिमकार्ड DELETE/REMOVE करण्यासाठी रिपोर्ट सबमीट करावा, त्यासाठी भारतीय दूरसंचार विभागाच्या ऑफिशियल TAFCOP (Telecom Analytics for Fraud Management & Customer Protection) या साइट वर जाऊन आपला आधार कार्डला जॉईन असलेला मोबाईल नंबर टाकावा, ते टाकल्यावर तुमच्या नावावर संपूर्ण भारतात किती मोबाईल नंबर लिस्टेड आहेत त्याची यादी खाली दिसेल, त्यातील नको असणारे, स्वतःचे नसणारे नंबर सिलेक्ट करून रिपोर्ट सबमिट करावा, DOT (दूरसंचार विभाग) कडून रीपोर्ट केलेले नंबर बंद केले जातील.
3) आपला फोन (सिमकार्ड) हॅक झाले आहे का हे तपासण्यासाठी #62# हे डायल करावे, हे डायल केल्यावर डिटेल्ड रीपोर्ट आपल्या स्क्रीन वर येईल, त्या रीपोर्ट मधील प्रत्येक ठीकाणी NOT FORWARD असेच यायला हवे अन्यथा आपले सिमकार्ड हॅक/क्लोन झालेले असते.
4) जर आपले सिमकार्ड कॉम्प्रमाईज झाले आहे असे आढळले तर हॅकिंग डिस्कनेक्ट करण्यासाठी #002# हा कोड डायल करावा,त्याने सर्व प्रकारचे फॉरवर्डस थांबतील, यानंतर वेळ न घालवता आपल्या सर्विस प्रोव्हायडरच्या अधिकृत कस्टमर केअर दुकानातून सिमकार्ड बदलून नवीन घ्यावे व जुन्या सिमकार्डचे दोन तुकडे करावेत.
5) आपल्या हॅण्डसेटमध्ये स्पायवेअर इन्स्टॉल झाले आहे का हे बघण्यासाठी गूगल प्ले स्टोअरमधील मेन मेन्यू वर जाऊन प्ले प्रोटेक्ट वर क्लीक करावे व फोन पूर्ण स्कॅन करावा. अपायकारक App सापडल्यास त्वरित डिलीट करावे. तसेच मोबाईल मध्ये चांगल्या कंपनीचे फक्त विकत घेतलेलेच अॅण्टी व्हायरस जरूर इन्स्टॉल करावे व त्याद्वारे दर 3/4 दिवसांनी संपूर्ण फोन स्कॅन करावा.
शेवटी हे सगळे प्रकार आपल्याच चुकीमुळे, बेसावध/बेजबाबदार पणानेच घडलेले असतात, म्हणून सायबर सुरक्षेचा मूल मंत्र कधीही विसरू नये. म्हणतात ना “सावधानी हटी तो दुर्घटना घटी”