नवी दिल्ली – चीनचा भारतावर हल्ला करण्याचा कोणताही इरादा नाही. मात्र त्यांचे सैन्य अभ्यासासाठी कधी कधी भारतात येतील असे वक्तव्य रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी भारताच्या प्रतिनिधींशी बोलताना केल्याचे वृत्त आहे.
त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पुतीन यांच्यावर टीका केली आहे. पुतीन भारताला धर्मशाळा समजतात का असा सवाल स्वामी यांनी विचारला आहे.
आपल्या ट्वीटमध्ये सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, मॉस्कोत पुतीन यांनी भारतीय प्रतिनिधींना आश्वासन दिले आहे. चीनची भारतावर हल्ला करण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केवळ भारतीय हद्दीत ते इकडे तिकडे अभ्यासाला येतील. त्यावरून स्वामींना हा निशाणा साधला व पुढे ते म्हणाले की चीनी येऊन गेले की पुन्हा आपल्याला भारताच्या हद्दीत कोणीच आले नाही असे ऐकायला मिळेल.