प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 30 -यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या काळात घरातील व सार्वजनिक ठिकाणचे निर्माल्य रस्त्यावर उघड्यावर न टाकता निर्माल्य कुंडीत टाकावे. गणेश मूर्ती विसर्जन ओढे, नदी, तलाव व धरणात न करता यासाठी तात्पुरते विसर्जन हौद तयार करणे व त्यातच गणपती विसर्जन करावे, याबाबत जनजागृती करून गावपातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.
गणेश मंडळांना आवाहन..
श्रमदान उपक्रम राबवावेत. या काळात शाश्वत स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण यावर आधारित देखावे व प्रबोधनात्मक कार्यक्रम, व्याख्यान उपक्रम राबवावेत.
स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणविषयक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे.
विसर्जन ठिकाणी निर्माल्यासाठी निर्माल कुंडी उभारणी करावी.
निर्माल्याचे उचित संकलन व वाहतूक करून त्यावर प्रक्रिया करावी.
प्लॅस्टिक मुक्त व पर्यावरणयुक्त गौरी गणेशोत्सव थिम सर्व गावात राबविण्यात यावी.
उपक्रमाची फेसबुक, व्हॉटस् ऍप, ट्विटर इत्यारी सामाजिक माध्यमांचा वापर करून प्रसिद्धी करावी.
शाळा महाविद्यालयात स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण इत्यादी विषयक निबंध, वक्तृत्व इत्यादी स्पर्धांचे आयोजन करावेत