रहिमतपूर, (प्रतिनिधी)- तारगाव (ता. कोरेगाव) येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहे. या सुवर्णमहोत्सवी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात उद्यापासून (दि. 9) होणार असून दि. 15 मे रोजी समाप्ती होणार आहे. या सोहळ्यास नामांकित कीर्तनकारांची सेवा लाभणार आहे.
सोहळ्यासाठी हभप कबीर महाराज अत्तार नाशिक, हभप विकास महाराज देवडे बारामती, हभप शिवलीलाताई पाटील पंढरपूर, हभप सागर महाराज बोराटे नातेपुते, हभप बाळकृष्ण महाराज वसंतगड कराड, हभप ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज कर्जत, हभप संजय महाराज वेळूकर यांची कीर्तने होणार आहेत.दि. 15 मे रोजी दुपारी चारपासून दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यात तारगाव येथील स्टार ग्रुपच्यावतीने आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा चित्ररथ सादर करण्यात येणार आहे.
या कालावधीत हभप आनंदराव येडे, हभप संतोष ढाणे, हभप नंदकुमार पाटील, हभप गोवर्धन महाराज कोरडे, प्रा. यशवंत पाटणे , हभप राजेंद्र सुकाळे यांची प्रवचने होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वारकरी संघटनेचे उपाध्यक्ष मदनराव महाराज कदम, हनुमंत महाराज घोरपडे उपस्थित राहणार आहेत. सुवर्णमहोत्सवी ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्यात तारगाव व पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन तारगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे .