दिलीप वळसे पाटील ः म्हाळसाकांत पाणी योजनेबाबत मुंबईत जलसंपदा मंत्र्यांबरोबर बैठक
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांच्या प्रश्नांवर तोडगा निघणार
मंचर – शिरूर तालुक्यातील पाबळ आणि परिसरातील 12 गावांची पाणी गरज पूर्ण करण्यासाठी म्हाळसाकांत पाणी योजना तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले, तसेच पाबळ, केंदूर आणि करंदी गावातील प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षण करणे आणि साठवण तलावासाठी जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आणि पाणी आरक्षित करण्याबाबत व जलसंपदा विभागाची जागा साठवण बंधाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाहीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना माहिती दिली.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 30) मंत्रालयात बैठक झाली. यावेळी वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
यावेळी प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले. सर्व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, त्याअनुषंगाने पुण्यात पुन्हा एकदा व्यापक बैठक आयोजित क रण्यात यावी, त्यास संबंधित लोकप्रतिनिधी यांना बोलवण्यात यावे, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.
बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, निलेश थोरात, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज , लोणी च्या सरपंच सरपंच उर्मिला ताई धुमाळ, आप्पा बोराडे,उद्योजक राजेश वाळुंज, रजना लंके अशोक आदक पाटील,जलसंपदाचे सचिव (प्रकल्प समन्वय) बसवंत स्वामी, कार्यकारी संचालक विलास रजपूत, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता सं. ज. माने, कुकडीचे अधीक्षक अभियंता सं. गा. सांगळे उपस्थित होते.