कर्ज भरायचे कसे या विवंचनेने शेतकरी त्रस्त
लाखणगाव- घराबाहेर पडलेल्या व रस्त्यावर दिसणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस प्रशासनाच्या दंडुक्याचा मार पडत असल्याने शेतकऱ्यांची विचित्र अवस्था झाली आहे. जिल्हा बॅंकेकडून घेतलेले कर्ज भरण्यासाठी मित्र परिवार, नातेवाईक यांच्याकडे पेट्रोल-डिझेल बंदीमुळे जाता येत नाही. हातउसने पैसे आणता येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांच्या रास्त अडचणींची जाणीव करून घ्यावी आणि पीककर्ज भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी, अशी मागणी करूनही जिल्हा बॅंकेकडून मात्र मौन पाळले जात आहे.
जिल्हा बॅंकेचे पीक कर्ज भरण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांकडून काही शेतकरी उसने पैसे आणत असतात; परंतु प्रवास बंदीमुळे शेतकऱ्यांना पैसे आणण्यासाठी जाता येत नाही. सोनेतारण करण्यासाठी सोनारांची दुकाने बंद आहेत. कर्ज भरायचे कसे या संभ्रमात शेतकरी सापडला आहे. जिल्हा बॅंकेने पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करूनही निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
- मार्चअखेर जवळ आल्याने संभ्रम वाढला
मार्चअखेर जवळ येऊ लागल्याने ग्रामीण भागात सोसायटी कर्ज भरणाऱ्यांची गर्दी जिल्हा बॅंकेत होऊ लागली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या संचारबंदीचा फटका कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बसत असून कर्ज भरायचे का नाही, अशा द्विधा अवस्थेत शेतकरी वर्ग सापडला आहे. सध्या - शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
कोरोनामुळे देशभरात संचारबंदी सर्वत्र लागू असल्यामुळे शेतकऱ्यांना एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करता येत नाही. अनेक शेतकऱ्यांची कुटुंबे शहरी भागात राहत असतात, असे शेतकरी मुंबई-पुण्यात राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडून पैसे आणत असतात; परंतु सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने पुणे मुंबईलाही जाता येत नाही. तेथील नातेवाइकांना पैसे पाठवता येत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे - बॅंकेकडून माहिती मिळण्यास अडचण
जिल्हा बॅंकेच्या वतीने शेतकऱ्यांना जूनपर्यंत कर्ज भरण्यासाठी मुदत वाढ आहे, अशा स्वरूपाची नोटीस लावावी, तसेच एसएमएसद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला मुदत वाढीबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे; परंतु अशा कुठल्याही पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना मिळत नसल्याने सोसायटी कर्ज भरण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. - शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत कर्ज भरले तर त्यांना 50 हजार रुपये आर्थिक सहायता सरकारच्या वतीने मिळणार असल्याने मार्चच्या आधी पैसे भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग आहे; परंतु हे पैसे भरायचे कसे, या संकटात शेतकरी सापडला आहे.
– बाबाजी गावडे शेतकरी, देवगाव - अनेक शेतकरी खासगी सावकाराकडून तीन रुपये टक्क्याने कर्ज भरण्यासाठी पैसे उचलत असून एप्रिलला सोसायटी मिळाल्यानंतर सावकाराची परतफेड करत असतात. सध्या संचारबंदी असल्याने सावकाराकडेही शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेलबंदीमुळे वाहनांद्वारे जाता येत नाही, असे
– मनोज रोडे पाटील, संचालक, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ