रावणगाव- येथे पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत चारशे आरोग्य कार्डांचे वाटप गुरुवारी (दि.7) करण्यात आले. भारत सरकारने पंतप्रधान आयुष्यमान भारत ही आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे विविध प्रकारच्या गंभीर आजारांवर पाच लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार नामांकित रुग्णालयांमधून केला जातो. याचा संपूर्ण खर्च सरकार करते.
यासाठी आरोग्य कार्ड बनवून देण्याचे काम सरकारने महा-ई सेवा केंद्र चालकांना दिले आहे. कुरकुंभ (ता. दौंड) येथील महा-ई सेवा केंद्राच्या वतीने रावणगाव (ता. दौंड) येथे गुरुवारी (दि.7) या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे चारशे नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला, तसेच रावणगाव, नंदादवी, कुरकुंभ,पांढरवाडी, कौठडी, याबरोबरच जिरगावमधील जवळपास एक हजार नागरिकांनी या योजनेचा लाभ घतल्याचे कुरकुंभ महा-ई सेवा केंद्र संचालक योगश रांधवण यांनी सांगितले. यावेळी रावणगावचे सरपंच धनाजी आटोळे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आटोळ, शैलेश धापटे, योगेश रांधवण, बजरंग आटोळे, अक्षय शिपकुले आणि रावणगावमधील नागरिक उपस्थित होते.