कात्रज – येथील नवीन वसाहतीत पाणी शिरल्याने तेथून स्थलांतरित केलेल्या सुमारे 200 कुटुंबांची व्यवस्था पालिका शालेत करण्यात आली आहे. येथील भैरवनाथ मंदिरात या नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सकाळी या आपत्तीग्रस्त वसाहतीची पाहणी करून आढावा घेतला.
कात्रज-कोंढवा रस्ता येथे पाण्याची मुख्यलाइन वाहून गेल्याने पाणीपुरवठा बंद झाला असला, तरी पर्यायी लाइन टाकून शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन उपअभियंता सुनील अहिरे यांनी दिले. पुराचे पाणी शिरल्यावर शिवशंभू प्रतिष्ठानचे महेश कदम व कार्यकत्यांनी गुजरवाडी फाटा, राजस सोसायटी येथे फिरून वाहनचालक व नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यास मदत केली. धनकवडी, सहकारनगर व कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अधिकारी व कर्मचारी, कात्रज अग्निशमन दल, भारती विद्यापीठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर व कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले.