पुणे – कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर उतरुन कामकरणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपत्ती सेवा पदक देऊनत्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक तोप्रस्ताव सादर करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
राज्यात मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाला आहे. त्यात संचारबंदीची अंमलबजावणीकरताना व लोकांनी घरात रहावे म्हणून पोलीस अहोरात्र रस्त्यावर उतरुनबंदोबस्त करीत आहेत. कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवून सामाजिक बांधिलकीकायम ठेवण्याचे अभुतपूर्व काम या काळात पोलीस करीत आहेत. हे करीत असतानाराज्यात आतापर्यंत हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सुमारे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मृत्युला सामोरे जावे लागलेआहे.
लॉकडाऊन अचानक जाहीर झाल्याने लाखो मजूर, कामगार आपल्या गावी जाऊ शकलेनाही. व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, अशा लाखोलोकांना पोलिसांनी या काळात मोठ्या प्रमाणावर मदत करुन त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय केली. आजपर्यंतच्या पोलिसांच्या इतिहासात इतके मोठेसामाजिक कार्य पोलिसांकडून प्रथमच होत आहे.
केंद्र सरकारने कामगारांना घरी जाण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांची यादीबनवून त्यांची प्रत्यक्ष विशेष श्रमिक रेल्वेगाड्या तसेच एस टी बसद्वारेत्यांच्या गावी रवाना करण्याची मोठा शिस्तबद्ध कार्यक्रम राज्यातीलपोलिसांनी राबविला आहे. अजूनही त्याची कार्यवाही सुरु आहे.राज्यातील सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्यनिभावले आहे. अशा सर्वांचे कौतुक, प्रोत्साहन करण्याकरीता त्यांना गृहविभागातर्फे आपत्ती सेवा पदक अथवा तत्सम पदक देऊन त्यांचा गौरवकरण्याकरीता सविस्तर प्रस्ताव सादर करावा असा आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.