आचार्य 1008 विजय शांतीसुरीजी महाराजसाहेब यांना घरूनच नमन
पुणे – जैन समाजाचे आचार्य 1008 विजय शांतीसुरीजी महाराजसाहेब यांच्या पुण्यातील शांती-सदन मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त रोषणाई करण्यात आली असून मंदिरात या निमित्ताने दीपोत्सव करण्यात आला.
पुणे शहरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने सर्व मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणी दर्शनसाठी, पुजेसाठी मंदिरात येऊ नये, आपापल्या घरीच गुरुदेवांची पूजा-अर्चना करावी, असे सर्व भक्तांना मंदिरातर्फे कळवण्यात आले आहे.
विजय शांतीसुरीजी महाराजसाहेब यांचा जन्म 25 जानेवारी 1890ला राजस्थान येथील मनादर गावात झाला. गुरुदेवांनी आपल्या 16व्या वर्षी दादागुरू श्री धर्मविजयजी महाराज यांच्या उपस्थितीत दीक्षा घेतली. त्यांनी अनेक साधना आबूच्या डोंगरात, गिरनारजी येथील डोंगरात आणि अचाळगडच्या डोंगरात केल्या. 1931ला अमेरिकेतील लेखक मिस.
नीलाक्रेम कुक यांनी आपल्या भारतभेटीत योगीराज शांतीसुरीजी महाराज यांची भेट घेतली आणि काही दिवस त्यांच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांचे विचार आणि त्यांची सिद्धी पाहून त्यांच्या पुस्तकात गुरुदेवांचे वर्णन केले आहे. भारतात लाखो भक्त आहेत जे गुरुदेवांचे वसंतपंचमी आणि गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात. मंडोली नगर, जालोर जिल्हा, राजस्थान येथे त्यांच्या मंदिरात दिवस-रात्र भजन कीर्तन आणि पूजा अर्चना करण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येत उपस्थित राहतात.