झारखंड: हजारीबाग येथील महात्मा गांधी यांचा पुतळा पडलेल्या अवस्थेत दिसून आला. दरम्यान हा पुतळा पडला की पाडला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी सांगितले की, “पुतळा स्वतः पडला की त्याची तोडफोड करण्यात आली याचा शोध घेण्यासाठी आम्ही तपास करत आहोत. आम्ही सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहोत आणि काही लोकांची चौकशी करत आहोत”.
1948 मध्ये या पुतळ्याची स्थापना केली होती
स्थानिक लोक या घटनेविषयी सांगतात की, 8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे तुकडे झाले आहेत. बापूंचा हा पुतळा गांधीजींच्या स्मारक म्हणून 2 फेब्रुवारी 1948 रोजी स्थापित करण्यात आला होता. गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज वर्मा यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. पुतळ्याचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
Jharkhand: Mahatama Gandhi’s statue in Hazaribagh found damaged. Police say, “We are investigating to ascertain whether the statue fell itself or was vandalized. We are also checking CCTV footage and questioning some people”. pic.twitter.com/u6EHS08wCC
— ANI (@ANI) February 9, 2020