पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपावर हा गंभीर गुन्हा आहे, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यावेळी ऍड. आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात जर चुकीची माहिती दिली असेल तर तो गुन्हे शाखेच्या अखत्यारीत येतो, पण लोक निवडणूक आयोगाकडे तक्रार का करतात हे समजत नाही.
राजकारणी हे ज्ञानी असतात, पण काही साधायचे असेल तर अज्ञानी असल्याचे सोंग घेतात. सरकार पाडायचे की टिकवायचे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवावे, असेही मत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.