शिर्डी – अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलत असतांना राज्यातील अनेक समस्यांवर भाष्य केलं. यावेळी नगरकरांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून चांगले काम होत असल्याचं सांगितले.
त्याचबरोबर फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ते म्हणाले, आमचे सरकार ‘हे फेस टू फेस बोलणारे सरकार…हे ‘फेसबुक’वर बोलणारं सरकार नाही असं म्हणत त्यांनी ठाकरे यांना खोचक टोला लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,’ आमचे सरकार जनतेसाठी काम करत आहे.’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाला आहे. दोघांची नजर उपमुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर अशी टीका केली जाते. यावर फडणवीस यांनी इशारा दिला की, आमची नजर खुर्चीवर आहे मात्र ती खुर्चीच्या संरक्षणासाठी आहे. कोणी आमच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीकडे कोणी वाकड्या नजरेने कोणी पाहू नये, यासाठी आमचे लक्ष मुख्यमंत्र्याच्या खुर्चीकडे आहे.’ असेही ते म्हणाले आहे.