मुंबई – शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. गोगावले माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झाले नाहीत.
आमच्यासारखे शिलेदार ताठ मानेने त्यांच्या मागे उभे राहिले. म्हणून शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले. असं भरत गोगावले म्हणाले. शिंदे गटातील आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणून मंत्रीपद कसे घेतलं आणि मिळालेली संधी कशी हुकली, याचा किस्सा गोगावले यांनी सांगितला आहे. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे. यावरून आता विरोधी पक्षातील नेत्यांनीही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
यावर आता यावर माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’काम करणारा व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदेंकडे पाहिलं जातं. भरत गोगावले यांनीही त्याग केला आहे. त्यात काही नवल नाही. ‘मी थांबतो, दुसऱ्यांना मंत्री करा’ अशी भूमिका घेतल्याने भरत गोगावले मागे राहिले.’ असं म्हणत बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.