पुणे – देवळाली ते मुजप्फरपूर मार्गावर धावणाऱ्या किसान रेल्वेची वाढती मागणी लक्षात घेता, मध्य रेल्वेने आठवड्यातून तीन दिवस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेकडून ऑगस्टपासून देवळाली ते दानापूर या मार्गावर किसान रेल्वे चालवण्यात येत आहे. या गाडीचा मार्ग वाढवून देवळाली ते मुजफ्फरपूरपर्यंत केला आहे. ही गाडी 8 सप्टेंबरपासून आठवड्यात दोनऐवजी तीन दिवस सोडण्यात येणार आहे.
या रेल्वेला पुण्यातून 2 पार्सल व्हॅन जोडण्यात येणार आहे. ही गाडी मनमाडमध्ये देवळालीहून येणाऱ्या पार्सल गाडीला जोडण्यात येणार असून, गाडी मुजप्फरपूरकडे रवाना होणार आहे. पुण्याहून दर मंगळवार, गुरुवार, शनिवार रोजी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी गाडी रवाना होणार असून, दौंड येथे 11.30 वाजता पोहोचणार आहे.