नवी दिल्ली – दिल्लीत गेल्या दोन दिवसात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याची माहिती आहे. विविध रुग्णालयांशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. गेल्या दोन दिवसांत 120 हून अधिक लोकांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्लीत परिस्थिती तणावपूर्ण आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीलमपूरमध्ये आता परिस्थिती सुधारत आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेपासून हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही. त्याचबरोबर पोलिसांनी बाबारपूर, जाफराबाद आणि गोकुळपुरी येथे वाहतूक बंद केली आहे.