पुणे : भारतीय जनता पक्षाने विविध प्रादेशिक नेत्यांची फौज दिल्लीच्या प्रचारात उतरवली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फडणवीस, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रचारात मराठी मतांसाठी वापर केला. प्रातिक मते आपल्याला मिळावी, अशी भुमिका भाजपाने प्रचारात घेतली होती.
केजरीवाल यांनी यातील चाल ओळखून या नेत्यांच्या प्रचारावर ट्विटरद्वारे उत्तर दिले होते. हे आपले पाहूणे आहेत. त्यांना खाऊ पिऊ घालून परत पाठवून द्या असे विनोदी ट्विटही गाजले होते. आता समाज माध्यमांत भाजपाच्या महाराष्ट्रातून गेलेल्या नेत्यांची नेटकरी समाज माध्यमांत खिल्ली उडवत आहेत. महाराष्ट्रात नाकारलेल्या विनोदविरांना दिल्ली करांनी ही नाकारले आहे असे या संदेशाचे स्वरूप आहे.
केजरीवाल यांची जुनी ट्विट री ट्विट करून अनेकांनी भाजपाच्या पराभवाच्या जखमेवर मिठ चोळले आहे. विकास आपला दिल्ली आपली असे संदेशही दुपारपासून फिरत आहेत.