नवी दिल्ली – 5 जी तंत्रज्ञान लवकरच भारतात लागू होणार आहे. त्याचा पर्यावरणावर तसेच लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार असल्याचे सांगत, अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून न्यायालयाने जुही चावला यांना चांगलच फटकारलं असून २० लाखांचा दंड ठोठावला आहे.
जूही चावला यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये अशी मागणी केली गेली होती की, 5 जी तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीचा विचार करण्यापूर्वी त्यासंबंधित सर्व प्रकारच्या अभ्यासांवर बारकाईने विचार केला पाहिजे. त्यानंतरच भारतात या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करता येऊ शकते.
दिल्ली उच्च न्यायालयाने जुही यांची याचिका फेटाळून लावली आणि २० लाख रुपयांचा दंड लावला. तसेच ही याचिका एक पब्लिसिटी स्टंटसाठी दाखल करण्यात आली होती. त्यामुळेच जुही यांनी सुनवाईची लिंक सोशल मीडियावर शेअर केली होती, असं न्यायालयाने म्हटलं.
Delhi HC dismisses with cost of Rs 20 lakh actress Juhi Chawla's lawsuit challenging 5G wireless network technology
— Press Trust of India (@PTI_News) June 4, 2021
या व्यतिरिक्त मागील सुनावणीच्या वेळी मोठ्या आवाजात गाणं लावणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. तसेच जुही यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग केला असून त्यांच्यावर २० लाख रुपयांचा दंड ठोठावला.