रांची : शेतकऱ्यांसाठी झारखंड सरकाने खुशखबर दिली आहे. लॉकडाऊन नंतर झारखंड सरकार शेतकऱ्याचे कर्ज माफ करणार आहे. शेतकऱ्यासाठी सरकारने बजेट तयार केले आहे. झारखंडचे कृषी मंत्री बादल पत्रलेख यांनी सांगितले कि, शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने २ हजार रुपयांचे बजेट तयार केले आहे. देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी कर्जमाफी पुढे ढकल्याणात आली होती. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता करू नये असं कृषिमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना दिलेले वाचन आम्ही कोणत्याही प्रकारे पूर्ण करू. पहिल्या टप्प्यात शेतकरी कर्जमाफीची पूर्ण यादी बँकांना दिली असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्शवभूमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. फुलांची विक्री न झाल्याने जम्मू येथील शेतकऱ्याने थेट फुल शेतीवर नांगर फिरवला आहे. कोरोना विषाणूने जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना जवळपास ७० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. जम्मूत २ हजार हेकटरमध्ये वेगवेगळ्या पुलांची शेती केली जाते.