नवी दिल्ली – ऐतिहासिक “दांडी मार्च” च्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी आणि या यात्रेत सहभागी झालेल्या इतर सर्वांना आदरांजली वाहिली. या संबंधात त्यांनी म्हटले आहे की, अन्यायाच्या विरोधातील एक प्रखर लढा म्हणून हा दांडी मार्च कायम स्वमरणात राहील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
मिठाचा सत्याग्रह मार्च, ज्याला 1930 चा दांडी मार्च म्हणूनही ओळखले जाते, ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना होती.ब्रिटिश राजवटीविरुद्ध सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा एक भाग म्हणून, गांधींच्या नेतृत्वाखालील “सत्याग्रहींनी” अहमदाबादमधील साबरमती आश्रमापासून दांडी या किनारपट्टीच्या गावापर्यंत 12 मार्च ते 5 एप्रिल असा दांडी मार्च काढला होता.