रजत शर्मा हा खरेतर माध्यम क्षेत्रातील माणूस. आपकी अदालत किंवा जनता की अदालत मुळे देशभरात नावाजला गेलेला हा एक पत्रकार. मात्र, सध्या विराट कोहलीप्रमाणे त्यानेही गौतम गंभीरशी पंगा घेतला.
कोहलीबरोबरच्या त्या घटनेनंतर रजत यांनी विनाकारण गंभीरला चिमटा काढला. अर्थात यावर गप्प बसेल तर तो गंभीर कसा. त्याने पलटवार केला. आता हे वाकयुद्ध आणखी कीती काळ सुरु राहणार हे माहिती नाही पण गंभीरला डीवचून रजत शर्माने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली हे खरे.
क्रिकेटचा निकष लावायचा तर रजत शर्माने कधी बॅटही हाती धरली नसेल परंतू त्याने पंगा घेतला तो भारताच्या 2007 सालच्या टी-20 व 2011 सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडकात सर्वात मोलाची कामगिरी बजावलेल्या गंभीरशी. गंभीर पूर्वी असा नव्हता, तो एक हसत खेळत आपली कामगिरी करणारा खुशालचेंडू क्रिकेटपटू होता.
मात्र, या दोन्ही विश्वकरंडक विजयाचे श्रेय केवळ महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्यासह अनेकांना दिले गेले मात्र, या दोन्ही स्पर्धांतील गंभीरने केलेल्या खेळीकडे साफ दुर्लक्ष केले गेले व त्याचे माथे भडकले. तेव्हापासून भारतातच नव्हे तर जगभरात कोणी धोनी व कोहलीचे कौतुक करताना दिसले की गंभीरचा पारा चढतो.
त्यातच यंदाच्या आयपीएल स्पर्धेत गंभीर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून लखनौ सुपर जायंट्ससाठी कार्यरत आहे. त्यांचा रॉयल चॅलेंजर बंगळुरुशी सामना झाल्यावर त्याचा आणि कोहलीचा वादही घडला. त्यानंतरही अनेकदा ते समोरासमोर आल्यावरही या दोघांनी साधा हॅंडशेकही केले नाही. यावरून माध्यमांमध्येही उलट सुलट बातम्या छापून आल्या.
या खरेतर याच दोघांशी निगडीत हा वाद आहे व त्यात तेल किंवा आपल्या भाषेत सांगायचे तर काड्या टाकण्याची रजत शर्मांना कीहीही गरज नव्हती. मात्र, तरीही त्यांनी हे उद्योग केले व आता ते त्यांच्याच गळ्याशी आले आहेत. एक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व विद्यमान खासदार असूनही त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रीय कोहली आहे. त्यामुळेच कोहलीचे कौतुक किंवा त्याची लोकप्रीयता गंभीरला खटकते असे विधान रजत शर्मांनी केले.
यावर गंभीरनेही जळजळीत ट्वीट केले आहे. एक माध्यमातील पळपुटा माणूस दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेत कर्तृत्व सिद्ध करण्याऐवजी चक्क पळून गेला व तोच आता मला नैतिकतेचे धडे देत आहे, असे ट्विट गंभीरने केले व रजत शर्मांची बोलती बंद झाली.