मुंबई : राज्यातील पुरस्थिती आणि दुष्काळाचा विचार करता विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करणारी जनहितार्थ याचिका उच्च न्यायलयात दाखल करण्यात आली.
राज्यातील निम्म्या भागात पुरस्थिती होती. उरलेल्या निम्म्या भागात दुष्काळाची स्थिती आहे. अशावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी झोकून देणे आवश्यक आहे. मात्र या काळात विधानसभा निवडणुका झाल्यास जनतेच्या मदतीऐवजी सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात जुमपले जातील. त्यामुळे जनतेच्या हालाला पारावर उरणार नाही, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
या गोष्टीचा विचार करून विधानसभा निवडणुका पुढे ढकल्याव्यात. जनतेला दिलासा देण्यासाठी ही बाब आबश्यक आहे, असे ही याचिका दाखल करणारे वकील विवेक श्रावण चवहण यांनी म्हटले आहे. या याचिकेवर आता न्यायालय काय निर्णय घेते यावर आता जनतेचे लक्ष लागले आहे.