तरुण लोक पआपल्या जिवलग व्यक्तीसाठी खूप काही करण्यास उत्सुक असतात. अनेकदा जोडीदाराला सरप्राईज किंवा गिफ्ट देऊन ते प्रेमात उत्साह टिकवून ठेवतात, मात्र वय झाल्यानंतर लोकांच्या नात्यात एक जडपणा किंवा कंटाळा येतो. जरी हे जोडपे एकमेकांवर प्रेम करत असले तरी वाढत्या वयानुसार ते प्रेमाची अभिव्यक्ती कमी करतात, ज्यामुळे त्यांच्यातील प्रणय आणि उत्साह संपतो. अनेकवेळा हे नाते तुटण्याचे कारणही बनते. या प्रकारची समस्या विवाहित जोडप्यांमध्ये दिसून येते, जे कुटुंब आणि मुलांच्या संगोपनामुळे एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. मात्र, वयाची चाळीशी ओलांडलेली अशी जोडपी त्यांच्या नात्यात नावीन्य आणण्यासाठी आणि प्रेम अधिक घट्ट करण्यासाठी काही छोट्या गोष्टींचा अवलंब करू शकतात. कसे? चला जाणून घेऊया.
– एक गुलाबाचे फूल करेल चमत्कार !
वयाची चाळीशी ओलांडलेल्या जोडप्यांना तरुणांप्रमाणे प्रेम व्यक्त करण्याची फारशी गरज नसते. त्यांच्यासाठी नात्यातील गोडवा आणि प्रणय टिकवून ठेवण्यासाठी एकच गुलाबाचे फूल पुरेसे आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्यांचे आवडते फूल किंवा लाल गुलाबाचे फूल देऊन चेहऱ्यावर हसू आणू शकता.
-भेटवस्तू द्या
प्रत्येकाला भेटवस्तू आवडते. जोडीदाराला भेटवस्तू देऊन नात्यातील उत्साह वाढवता येईल. खूप खर्च करण्याची गरज नाही, तुमच्या जोडीदारासाठी तुमच्या बजेटनुसार गिफ्ट आणा आणि त्याला छान सरप्राईज द्या.
– एकमेकांना वेळ द्या
नाते घट्ट आणि सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी जोडीदाराला नक्कीच वेळ द्या. तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत तुमच्याकडे वेळ नसेल, तर महिन्यातील एखादा दिवस तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराला समर्पित करा. त्यांना स्वयंपाकघरातील कामात मदत करा किंवा एकत्र काही काम करा.
-प्रेम व्यक्त करा
तरुणाई आपले प्रेम सहज व्यक्त करते, मग लग्नाच्या बंधनात बांधलेल्या पती-पत्नीला ते व्यक्त करणे इतके अवघड का आहे? त्यामुळे वेळोवेळी तुमच्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करा. तुमच्या जोडीदाराला फक्त ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ एवढंच म्हणा. तुम्हाला व्यक्त करण्यास अस्वस्थ वाटत असल्यास, लिहा. किंवा चक्क हातवारे करून तुमच्या भावना व्यक्त करा. यामुळे तुमच्या जोडीदाराला एक सुखद धक्का बसेल.