– दत्तात्रय गायकवाड
वाघोली – पुणे शहराचा उपनगरीय भाग म्हणून वाघोलीची ओळख आहे. वाघोलीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या लोकसंख्येबरोबर नागरिकांच्या समस्यांची जाणीव तसेच त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार कौतुकास्पद आहे. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून लसीकरण मोहिमेवरून वाघोली गावात चर्चेला उधाण येत राजकीय रंग गडद झाल्याचे जाणवू लागले आहे. सोशल मीडिया, वैयक्तिक टिकाटिपणी करण्यात येत आहे. त्यामुळे राजकारण थांबवा समाजकारण करा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
वाघोलीमधील बीजेएस करोना सेंटरला स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांनी भेटी दिल्या. त्यानंतर वाघोलीमध्ये नागरिकांना लसीकरणाबाबत जनजागृतीपर फलकाद्वारे लोकप्रतिनिधींनी आवाहन केले. यादेखील ठीक ठिकाणी लावलेल्या फलकामधून सुरुवातीला राजकीय रंगांची उधळण सुरू झाली.
45 वयोगटाच्या वरील नागरिकांसाठी लसीकरणाचा टप्पा नुकताच पार पडला. यामध्ये वाघोलीमधील सोसायटी भागामध्ये लसीकरणाचा प्रयोग लोकप्रतिनिधींनी घेतला. नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतल्यानंतर लसीकरणाबाबत व्हिडिओ प्रतिक्रिया देऊन लोकप्रतिनिधींचे आभार मानत लसीकरणाबाबत समाधान मानले.
यानंतर याच लसीकरणावर आरोप-प्रत्यारोपांच्या तक्रारी मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे झाल्याने राजकीय रंगांची रंगछटा वाघोलीमधील लसीकरणाबाबत गडद होऊन गेली. बीजेएस महाविद्यालयाच्या आवारात असणारे लसीकरण केंद्र बंद करून प्राथमिक आरोग्य केंद्रात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुरू करण्यात आले. या लसीकरण केंद्राची नागरिकांना माहिती नसल्याने त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ लागली. येथील सुखसुविधा तसेच सुरक्षित अंतराचा अभाव व इतर मुद्दे स्थानिक लोकप्रतिनिधींनी उचलून धरले.
त्यावरून केंद्राची जागा बदलल्याने पुन्हा एकदा राजकारण तापले. वाघोलीमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. पाच दिवसांपूर्वी यशस्वीरित्या लसीकरण मोहीम, कोविड सेंटरमध्ये सुखसुविधा मिळवून देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन काम करत होते. आता मात्र राजकीय रंगांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली येथील आरोग्य व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहेत.
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या प्रयत्नांसाठी नागरिक समाधानी होते. आता मात्र त्यांच्यात राजकीय रंगांची उधळण होऊ लागल्याने नागरिकांमध्ये याबाबत नाराजी वाढू लागली आहे. लसीकरण केंद्रांची लोकसंख्येच्या प्रमाणात संख्या वाढली गेली पाहिजे. वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
नागरिकांना मदतीची अपेक्षा-
राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका थांबवून गेल्या 14 महिन्यांपासून वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.
मागील वर्षी गरजू नागरिकांना सर्वात जास्त अन्नधान्यांचे किट वाटप करणारे, कामगार मजुरांना रोजच्या जेवणाची व्यवस्था करणारे, नागरिकांना घरपोच भाजीपाला मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासणारे लोकप्रतिनिधी वाघोलीच्या नागरिकांमधील जाणिवेचे एक उत्तम उदाहरण होते. जिल्ह्यात सर्वात जास्त मदतीचा ओघ वाघोली मधे पहावयास मिळाला. याच उदाहरणाची पुनरावृत्ती यापुढील काळात होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात