मुंबई – महाराष्ट्रात आज कोरोना बाधित असलेल्या रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लोकांची वाढती वर्दळ रोखण्यासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. कोरोना बाधित लोकांची वाढ रोखण्यासाठी बीएमसीने शॉपिंग मॉल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नागरिकांना त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव असल्याचे दाखवणे बंधनकारक केले आहे. बीएमसीचे यावर मत आहे की, विनाकारण फिरणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी होईल.
२२ मार्च पासून, मुंबईतील कोणत्या ही मॉलमध्ये जायचे असेल, तर नागरिकांना एक कोविड -१९चा निगेटीव रिपोर्ट दाखवावा लागेल. जर विजिटर्सकडे निगेटीव रिपोर्ट नसेल, तर त्याला शॉपिंग मॉलमध्येच एंटीजन टेस्ट करुन घ्यावी लागेल. बीएमसीने शुक्रवारी एका परिपत्रकात सांगितले की, यासाठी मुंबईतील सर्व मॉल्समध्ये जलद प्रतिजैविक चाचणीची सुविधा असेल. प्रवेश गेटवर या कामासाठी एक संघ नियुक्त केला जाईल.
बीएमसीच्या म्हणण्यानुसार,या टेस्टचा खर्च मॉल किंवा नागरिकांना द्यावा लागेल. जर तुमच्याकडे RT PCR टेस्टचा रिपोर्ट आहे, तर त्याचा अवधी ७२ तासांचा असेल. अशात तुम्हाला एंटीजेन टेस्ट करावी लागणार नाही. बीएमसी मॉलनंतर लगेच रेलवे स्टेशन, सिनेमा हॉल, पब, हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणावर नियम लागू केला जाऊ शकतो. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवरील खर्च बीएमसी उचलेल. इतर बाकी ठिकाणचा खर्च VISITER या PLACE OWNER यांना उचलावा लागेल.
यापूर्वी, महाराष्ट्रातील कोविड -१९ संक्रमण दराची वाढ रोखण्यासाठी पालिकेने दादर घाऊक भाजीपाला आणि फुलांच्या बाजारांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. अनेक लोक बाजारात जमा होतात, मास्क घालत नाहीत आणि सामाजिक अंतर राखत नाही म्हणून हे पाऊल उचलले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी (१८ मार्च) गेल्या २४ तासांत राज्यात २५,८३३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु तरीही लोक भीती व संसर्ग रोखण्यासाठी चिंतित नाहीत. लोक सरास निर्भिडपणे भटकत आहेत आणि नियम पाळत नाहीत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार ,शुक्रवारी मागील २४ तासात देशभरात एकूण ३९७२६ कोरोना बाधित लोकांची नोंद केली गेली आणि १५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा आकडा १५९३७० गेला आहे. त्याचबरोबर २ कोटी १० लाख ८३ हजार ६७९ लोक ठीक झाले आणि देशात २,७१,३६४ अॅक्टिव्ह केसेस आहेत.